अर्धवट जत्रा

         

                                





 मला आठवत  नाही नक्की आम्ही कुठून कुठे जात होतो हे.  अस वाटत होत जस आम्ही कुठच्या तरी  जत्रेलाच आलोय. माझ्यासोबत माझा भाऊ - त्याची बायको  आणि त्यांचा मुलगा असे आम्ही चौघेजण जत्रेसारख्या गर्दीमध्ये  पुढे  पुढे चालतच होतो.

             अचानक आम्ही एका दुकानाकडे वळलो. आणि त्या दुकानांमध्ये खरेदी करायला लागलो. त्या  दुकानात जाण्यापूर्वी त्या दुकानाच्या  मालकासोबत एक तरुण मुलगीपण होती. आणि  तेव्हाच त्या दुकानदाराची  आम्हाला त्याची वाईट नजर दिसून आली.  तरीपण का कुणास ठाऊक आम्ही त्या दुकानाकडे वळलो.


             दुकानाकडे जाता क्षणी त्या दुकानामधली तरुण मुलगी अचानक निघूनच गेली. आणि दुकानामधला मालकसुद्धा एकदम  साधा असल्यासारखा नाटक करू लागला.
              भावाने आणि वहिनीने बरीच खरेदी केली आणि भाऊ अचानकच कुठेतरी निघून गेला. मग वाहिनीने पैसे किती झाले म्हणून विचारले तर दुकानाचा मालक बोलला ५००  झाले. मग वाहिनी ५०० रुपये काढून देताचक्षणी तो बोलला पैसे नको माझ्यासाठी पोरगी असेल तर  द्या लग्न करण्यासाठी.  हे ऐकून साहजिकच मला खूप राग आला पण मी काहीच बोललो नाही.
              त्यावेळी वाहिनीच स्वतः  खूप नम्र पणे  त्याच्याशी बोलली , कि तू आमच्यापासून लपवण्यासाठी तुझं वागणं अचानक बदलण्याचा प्रयत्न केलास . एवढ सगळं स्वतःला बदलूनही शेवटी पैशाच्या मोबदल्यात पोरगी मिळेल अशी अपेक्षा ठेवलीस . स्वतःच्या सुखासाठी दुसऱ्याचा आयुष्य बरबाद झालं तरी चालेल असा विचार केव्हा करू नकोस. कायम स्वतःला चांगल घडवण्याच्या कामामध्ये व्यस्थ ठेव .  चांगली मुलगी  स्वतःहून येईल. एवढ सगळं नम्रपणे बोलून वहिनीने ५०० रुपये त्याला दिले आणि पेढ्यांचा बॉक्स घेऊन  आपल्या पिशवीत टाकला  व त्याला बोलली हे तू  ग्राहकांसोबत चुकीचा वागल्याबद्दल. आणि यापुढे कुणासोबत असं वागू नकोस.
           हे ऐकून दुकानाच्या मालकाने अजून एक पेढ्यांचा  बॉक्स वहिनींना दिला. मला यावर लगेचच संशय  आला. पण वाहिनीने तो पिशवीत ठेवला. यानंतर अजून दुकानातल्या वस्तू तो वहिनींना द्यायला लागला. वहिनींना पण काही सुचेनासं झालं . मी वहिनीला लगेच बोललो कि बस्स झाला निघूया इकडून लगेच. यावर दुकान मालक दुकानातून बाहेर आला त्याच्या हातामध्ये लोखंडाची शीग होती. एका क्षणी मला विश्वास नाही बसला कि दुकानदार असं वागू शकतो पण तो  जेव्हा बोलला की  अजून काय हवं ते भरून घ्या पिशवीत सगळ्यांची शेवटची इच्छा म्हणून .

यावेळी मी समजून गेलो कि  वेळ निघून गेली अस. त्याक्षणी मला असच वाटलं सगळं क्षणात संपल म्हणून, त्यावेळी अचानक असा पण विचार आला कि आता संपणारच आहे  तर आपल्याला जमेल  तसा  प्रयत्न करू. मग मीच स्वतः हिम्मत करून बिनधास्त पुढे गेलो आणि ती त्याच्या हातामधली लोखंडाची सळी पकडली. तर तो  धमकी देऊ लागला. तरीपण मी माझी पूर्ण ताकद लावून त्याचा सामना करण्याचा प्रयत्न केला. आणि त्याला बोललो आम्ही तीन जण आहोत लक्षात ठेव . हे बोलताच क्षणी का कुणास ठाऊक तो खूपच घाबरून गेला. तरीपण मी पण अजूनही घाबरलेलाच  होतो.  पण  मी घाबरलोय असं  त्याला दाखवल नाही. आणि माझ्या भावाला जोरात ओरडून बोलवायला लागलो.

         यानंतर काही विघ्न घडायच्या अगोदरच मला जाग आली व थोडा वेळ भितीदायक झाला खरा  पण हे फक्त स्वप्न होत हे मी  समजून गेलो.
                      
                                                                      लेखक - हेमंत गोसावी     उर्फ़- (Casper Gosavi)

 

                                                                    

टिप्पण्या